भारतीय राजकीय इतिहासाला वेगळे वळण लावणारा आजचा दिवस. १९६६मध्ये आजच्याच दिवशी (१९ जानेवारी) श्रीमती इंदिरा गांधी यांची काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाली व त्यामुळेच त्यांनी २४ जानेवारी रोजी भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि इतिहासाने वेगळे वळण घेतले.
त्या घटनेला आज ५५ वर्षे झाली.
लालबहादूर शास्त्री यांच्या अकाली निधनामुळे पुढील पंतप्रधान कोण हा प्रश्न ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांसमोर उभा ठाकला, तेव्हा ‘गूँगी गुडिया’ म्हणून पंतप्रधानपदी इंदिराजींची निवड करण्यात आली.
... पण लवकरच इंदिराजींनी आपण ‘सबला’ असल्याचे साधार सिद्ध केले व इतिहास घडवला.
भारताच्या तिसऱ्या व पहिल्या महिला पंतप्रधानांना श्रद्धांजली!
- भारतकुमार राऊत